खानापूर

पाण्याच्या टाकीत साप कुजल्याने दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

खानापूर: तालुक्यातील अती दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देगाव गावातील पाण्याच्या टाकीमध्ये साप कुजल्याने गावात दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिरोली पंचायत हद्दीत येणाऱ्या देगाव घनदाट जंगल भागात असल्याने गाव अनेक सरकारी सुविधांपासून वंचित आहे. काही ठिकाणीं पाण्यासाठी टाक्या असल्या तरी त्या बसल्यापासून ग्राम पंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे. काही ठिकाणी नळ खराब झाले आहेत तर काही ठिकाणी झाकणे  तुटली आहेत. यामुळे या पाण्याच्या टाक्यांमध्ये घान साचली असून जीव जंतू मरत आहेत.

बसवण्यात आलेल्या एका टाकीत साप कूसल्याने गावभर वास सुटला असून लोक आजारी पडत आहेत. तरी ग्रामपंचायतीने लवकरात लवकर या टाक्यांची साफ सफाई  करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते