बेळगाव

पाण्याच्या टाकीत पडून 2.5 वर्षाच्या बालिकेचा दुर्देवी मृत्यू

बेळगांव: खेळत असताना घरासमोरच्या पाण्याच्या टाकीत पडल्याने अडीच वर्षांच्या मुलीचा बुडून मृत्यू झाला. मृत मुलीची ओळख कंग्राळ गल्ली येथील साईशा संदीप बडवन्ना अशी आहे. रविवारी सायंकाळी कंग्राळ गल्ली येथे ही घटना घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी नेहमीप्रमाणे नळाला पाणी आले होते. यासाठी, घरासमोर असलेल्या पाण्याच्या टाकीचा झाकण उघडला गेला आणि पाणी भरले गेले. पाणी भरल्यानंतर, झाकण उघडेच राहिले. दुपारी साईशा घरासमोर खेळत होती. खेळत असताना ती पाण्याच्या टाकी जवळ गेली आणि नकळत पाण्याने भरलेल्या टाकीत पडली. हे कोणीच पाहिले नाही. काही काळानंतर साईशा घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर शोध सुरू झाला. बराच वेळ मुलीचा शोध घेण्यात आला पण साईशा कुठेच दिसेना. शोधता शोधता एकाची नजर उघड्या असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये गेली. टाकीत मुलगी दिसली पण मृत अवस्थेत. साईशा यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. काल रात्री उशिरा खडेबाजार पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक राघवेंद्र बी. व टीम अधिक तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते