क्राईम

खानापूर: मऱ्याम्मा मंदिर जवळ अपघात, एक ठार

खानापूर:  शुक्रवारी, 21 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता शहरातील मऱ्याम्मा मंदिराजवळ हलकर्णी कत्रीवर एका दुचाकीस्वाराने ट्रकला ओव्हरटेक करताना समोरच दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन एकाचा मृत्यू झाला आहे.

खानापूर येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते

मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक युवक आणि एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, विद्यानगर खानापूर येथील संजू मल्लापा सत्यनाईक  (वय 36), हे आपली दुचाकी केए 22 एच सी 3227 क्रमांकाच्या होंडा शाईनवरून खानापूर- बेळगाव रस्त्यावर बेळगावच्या दिशेने जात होते.

हलकर्णी क्रॉस जवळ, अण्णु दत्तू शिंदे हे चालवित असलेल्या ट्रकला (केए 22-8247) ओव्हरेटेक करण्याच्या प्रयत्नात असताना, पुढे चाललेल्या तुकाराम सुतार यांच्या  दुचाकीला (केए 22-एचए 4806) धडक दिल्याने, दुचाकी चालक तुकाराम सतीश सुतार यांच्या पत्नी सारिका तुकाराम सुतार, या खाली पडून किरकोळ जखमी झाल्या. .

तर संजू मल्लाप्पा सत्यनायक यांची दुचाकी ट्रकच्या उजव्या बाजुस आढळल्याने, संजू मल्लाप्पा सत्यनाईक ट्रकच्या पाठीमागील चाकात पाय सापडून गंभीर जखमी झाले. .


त्यांना खानापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  मात्र संजू सत्यनायक गंभीर जखमी झाल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

संजू सत्यनाईक याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. सदर घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते