खानापूर
आई-वडिलांशी वाद, तरुणाची आत्महत्या
हलकर्णी (ता. खानापूर) :
मारुती गल्लीत राहणाऱ्या १९ वर्षीय प्रतीक राजू चुरमुरी या तरुणाने शनिवारी (११ मे) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्राप्त माहितीनुसार, प्रतीक आपल्या आई-वडिलांना रोजंदारीवर काम करत असताना मदत करत असे. मात्र काही दिवसांपासून तो कामावर जात नव्हता. त्यामुळे त्याचे आई-वडिलांशी किरकोळ वाद झाले होते. आई-वडिलांचे बोलणे मनावर घेऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते.
घटनेच्या वेळी घरात कोणीही नसताना त्याने गळफास घेतला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. या प्रकरणाची नोंद खानापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.