खानापूर

जळगे येथील हत्तीला पकडण्यात वनविभागाला आले यश, ग्रामस्थांना दिलासा

खानापूर: तालुक्यातील जंगल परिसरात वनविभागाला मोठं यश आलं आहे. अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या हत्तीला बंदोबस्त करण्यासाठी शिमोगा येथील तज्ज्ञ हत्तींचं पथक खानापुरात दाखल झालं होत. यामुळे वनविभागाने रानटी हत्तीला पकडण्यात यश मिळवलं आहे, ज्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

खानापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वन्य प्राण्यांचा धुमाकूळ सुरू होता. रानटी हत्त्यांनी पिकांचे नुकसान केल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. विशेषतः  जळगे-करंबळ गावात एका रानटी हत्तीचा उपद्रव वाढला होता, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हत्तीच्या धुमाकूळामुळे वनविभागाला तंत्रज्ञानाचा वापर करून विशेष पथक तयार करावं लागलं.

https://www.instagram.com/share/reel/BBKyG23withttps://www.instagram.com/share/reel/BBKyG23wit

शिमोगा येथील प्रशिक्षित हत्तींच्या पथकाने खानापुरात येऊन हत्तीला जेरबंद केलं. खानापूरचे आरएफओ श्रीकांत पाटील, नंदगड विभागीय वनाधिकारी माधुरी दलवाई यांच्यासह वनविभागाचे अधिकारी या मोहिमेत सक्रिय होते. वनविभागाच्या कडून चोख बंदोबस्त ठेवला गेला, पोलीस आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जनजागृती केली आणि ग्रामीण भागात सुरक्षा उपायांची अंमलबजावणी केली.

या यशस्वी कारवाईमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय आणि वनविभागाच्या कार्यक्षमतेची दखल घेतली गेली आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते