खानापूर

कुसमळी पुलाजवळ पर्यायी पूल वाहून गेला; नवीन पुलाचे काम रखडले

जांबोटी | शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येऊन अखेर कुसमळी पुलाजवळ बांधलेले पर्यायी पूल वाहून गेले आहे. नदीतील पाण्याच्या वाढीमुळे सध्या या ठिकाणी पुन्हा पर्यायी पूल उभारणे अशक्य झाले आहे. दरम्यान, नवीन पुलाच्या दरवाजांचे काम पूर्ण झाले असले तरी, पुलाच्या दोन्ही बाजूंचे अप्रोच रस्ते आणि इतर संबंधित काम पूर्ण होण्यासाठी कंत्राटदारांनी अजून महिन्याच्या कालावधीची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे.

यामुळे बेळगाव-जांबोटी-चोर्ला मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. वाहतुकीचा ओघ खानापूरमार्गे जांबोटी आणि बेळगाव-बैलूरमार्गे देवाचीहट्टी-जांबोटी या अरुंद रस्त्यांवर वळवण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गांची अवस्था आणखी बिकट झाली आहे.

पावसाचा जोर वाढत असल्याने परिसरात सर्वत्र पाण्याची भर पडली आहे. शनिवारी रात्रीपर्यंत पर्यायी पुलावर पाणी नव्हते. मात्र, रविवारी सकाळी मलप्रभा नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने हा पर्यायी पूल वाहून गेला. नवीन पुलाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने जांबोटी परिसरातील नागरिक, तसेच गोवा व बेळगावकडे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या