खानापूर

खानापूर वारकऱ्यांच्या गाडीला अपघात; विठ्ठलदर्शनाआधीच दु:खद घटना

खानापूर, २० मे – खानापूर तालुक्यातील खैरवाड येथून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी रविवारी रात्री निघालेल्या भाविकांच्या क्रूझर वाहनाला सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. सांगोल्याजवळील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पुलाच्या कठड्याला जोरात धडकले. या अपघातात ११ जण जखमी झाले असून, त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.

गंभीर जखमी झालेल्यांमध्ये शंकर मंडोळकर, रुद्राप्पा भुजगुरव आणि जोतिबा वाकले यांचा समावेश असून त्यांच्यावर पंढरपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यल्लारी गुरव, तानाजी झुंजवाडकर, कीसन भुजगुरव, विठ्ठल कोलेकर, माणिक कोलेकर, परशुराम सागरेकर, नाळकर आणि रेमाणी बस्तवाडकर हे अन्य जखमी असून त्यांच्यावर सांगोला येथील स्पंदन रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

या घटनेनंतर नागाप्पा भुजगुरव, प्रवीण कोलेकर, गौराप्पा गुरव आणि रुक्मिणा झुंजवाडकर हे अपघातस्थळी पोहोचले. त्यांनी जखमी भाविकांची भेट घेऊन विचारपूस केली. सांगोला येथील आठ जखमींना पुढील उपचारासाठी बेळगाव येथे हलवण्यात आले आहे.

दरम्यान, उर्वरित तिघांवर पंढरपूरच्या लाईफ लाईन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?