खानापूर

जामगावच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून केली रस्त्याची डागडुजी

खानापूर: तालुक्याच्या शिरोली पंचायत हद्दीतील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यंदाच्या मुसळधार पावसामुळे जामगाव गावचा रस्ता पूर्णपणे खचून गेला असून ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे व चिखल साचला आहे. हा रस्ता खराब झाल्याने गावात बस व इतर वाहनांना येण्या जाण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. याचबरोबर गावातील विद्यार्थी व नागरीकांना गावाबाहेर जाण्यास देखील त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यावर मुरूम टाकताना गावातील नागरिक

हे सर्व पाहून गावकऱ्यांनी प्रशासनाची वाट न पाहता स्वखर्चाने व श्रमदानाने या रस्त्याची डागडुजी करून सध्या रस्ता वाहतुकीस योग्य करून घेतला आहे.

यावेळी गावातील अप्पू गावकर, मारुती गावकर, रामा कणकुमकर, नारायण गावकर आदी उपस्थित होते.

Jamgav Khanapur

Shiroli Panchayat Area

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या