खानापूर

खानापूर तालुक्यात 9 हत्तींचा कळप, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

खानापूर: तालुक्यातील गुंजी भागातील शिंदोळी, आंबेवाडी आणि आसपासच्या गावांमध्ये हत्तींचा मोठा कळप घुसल्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा कळप शेतकऱ्यांच्या कापणीच्या भात पिकांचे प्रचंड नुकसान करत आहे.

गेल्या काही दिवसांपासून एक हत्ती चापगाव, कारलगा जळगे परिसरात फिरत होता व त्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. मात्र आता, शिंदोळी गावातील शेतवडीमध्ये 9 हत्तींचा मोठा कळप घुसून  2 ते 2.5 एकर शेतीचे  नुकसान केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

शिंदोळी गावातील व्हिडिओ

आज सकाळी शिंदोळी kh येथील शेतकरी गणेश नागो गावडा, विठ्ठल नागो गावडा आणि हनुमंत सदोबा गावडा यांच्या सर्वे नंबर २ मधील शेतात ९ हत्तींच्या कळपाने पिकांचे पूर्णतः नुकसान केले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी या वनखात्याकडे हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

आंबेवाडी गावातील दृश्य

तसेच गुंजी पंचायत हद्दीतील आंबेवाडी गावातही हत्तीने  भात पिकांचे मोठे नुकसान केले आहे, त्यामुळे शेतकरी चिंतीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?