खानापूर

जळगेनंतर कौंदल हादरलं: हत्तींच्या उपद्रवाने शेतकऱ्यांची झोप उडाली!

खानापूर:   जळगे करंबळ गावात धुमाकूळ घातलेल्या हत्तीला पकडण्याची बातमी ताजी असताना कौंदल गावात नव्या हत्तींच्या उपद्रवाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नागेश भोसले यांच्या शेतातील नारळ, केळीची झाडे, सागवानाची रोपे आणि भाजीपाला उद्ध्वस्त झाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेचा तपशील:
मंगळवार, 14 जानेवारी रोजी नागेश भोसले शेतात गेले असता, त्यांनी नारळ आणि केळीची झाडे मुळासकट उखडून फेकलेली व मोडलेली पाहिली. भाजीपाला पिकाचेही नुकसान झाल्याचे दिसून आले. निरीक्षण करताना त्यांना हत्तींच्या तीन प्रकारच्या पायांचे ठसे आढळले. त्यामुळे तीन हत्तींच्या वावराचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांनी तातडीने ही माहिती वन खात्याला दिली.

गेल्या काही दिवसांतील पार्श्वभूमी:
चार दिवसांपूर्वी जळगे गावात शिमोगाहून आणलेल्या हत्तीने शेतीचे नुकसान केल्याची घटना घडली होती. वन खात्याने त्या हत्तीला जेरबंद केले होते. मात्र आता पुन्हा कौंदल परिसरात हत्तींच्या उपस्थितीने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते