खानापूर

गोधोळी ग्रामपंचायतीचे वॉटरमन संतोष पाटील यांचा अपघातानंतर  मृत्यू

खानापूर:  तालुक्यातील गोधोळी ग्रामपंचायतीचे वॉटरमन संतोष गोपाळ पाटील (वय 34) यांचा शुक्रवारी (आज) दुपारी 12 वाजता हुबळी येथील केएमसी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. सोमवारी (गेल्या आठवड्यात) अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. मात्र वेळेवर योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

संतोष पाटील हे 2010 पासून गोधोळी ग्रामपंचायतीत वॉटरमन म्हणून काम करत होते. त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने जनसेवा केली होती.

सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते रामनगर रस्त्यालगत ढोलकी सावर तळ्याजवळ पाणी सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी समोरून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने उपचारासाठी दोन-तीन रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. ग्रामपंचायतीचे अभिवृद्धी अधिकारी एच. व्हीं. पाटील यांनी त्यांच्या उपचारासाठी विशेष प्रयत्न केले. मात्र, उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला.

संतोष पाटील हे अविवाहित होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूनं गोधोळी परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या