खानापूर

पालकमंत्री सतीश जारकीहोळींनी खानापूर दौऱ्यात घेतले नंदगड श्री. लक्ष्मीदेवीचे दर्शन

खानापूर: आज दुपारी जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी खानापूर दौऱ्यावर उपस्थित राहिले. दुपारी ३ वाजताच्या सुमारे कितुरहून बिडीला पोहोचल्यावर, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या सूचनेनुसार सुरेश जाधव यांनी मंत्री यांचे शाल घालून आदरपूर्वक स्वागत केले.

यावेळी केपीसीसी सदस्य महादेव कोळी आणि ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मानतेश राऊत यांनी हार व बुके देऊन मंत्री यांचे स्वागत केले. तसेच, युथ काँग्रेसचे अध्यक्ष साईश सुतार आणि इसाक पठान यांनीही हार घालून आदरणीय मंत्री यांचे अभिनंदन केले. नगरसेवक तोहीद, बीडी पंचायत अध्यक्ष संतोष काशिलकर, मेंबर सुनील कदम आणि संतोष हांजी यांनीही हार घालून आपले स्वागत मांडले.

यानंतर, पालकमंत्रींनी नंदगड यात्रेला भेट दिली आणि तिथे लक्ष्मी देवीचे दर्शन घेत पुजा केली. यात्रेच्या कमेटीने मंत्री यांचे उत्साहपूर्वक स्वागत केले.

दौऱ्यादरम्यान, काँग्रेस कार्यकर्ता शफी काजी यांच्या घराला देखील भेट देण्यात आली जिथे त्यांच्या वडिलांच्या नुकत्याच झालेल्या निधनाबद्दल शफी काजीच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले गेले. तसेच, वैष्णवी पाटील, अल्ताफ बसरीकट्टी आणि तालुक्यातील काँग्रेस समर्थकांचीही उपस्थिती नोंदवण्यात आली.

या कार्यक्रमात पालकमंत्रींनी स्थानिक जनता, राजकीय कार्यकर्ते आणि समर्थकांसह एकत्र येऊन भावनिक आणि श्रद्धाभरे वातावरणात लोकसेवेची भावना अधोरेखित केली.

Back to top button
अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते