खानापूर

शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला: चिगुळे येथील घटना, शेतकरी गंभीर जखमी

खानापूर वार्ता:
खानापूर तालुक्यातील चिगुळे येथे एका शेतकऱ्यावर अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. जखमी शेतकऱ्याचे नाव विलास हेमाजी चिखलकर (वय 55) असे आहे.

घटनाक्रम:
विलास चिखलकर रविवारी सकाळी गावाजवळील शेताकडे गेले होते. विश्रांतीसाठी ते झोपडीत गेले, परंतु त्याठिकाणी एक अस्वल आणि त्याची दोन पिले होती, याची त्यांना कल्पना आली नाही. झोपडीत प्रवेश करताच अस्वलाने आपल्या पिलांसह त्यांच्या दिशेने हल्ला केला. शेतकऱ्याने बचावासाठी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र अस्वलाच्या हल्ल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत चिखलकर घराकडे परतत असताना, रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने त्यांना पाहिले आणि तातडीने मदत केली. त्यांना त्वरित बेळगाव जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत चिखलकर घराकडे परतत असताना, रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने त्यांना पाहिले आणि तातडीने मदत केली. त्यांना त्वरित बेळगाव जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनखात्याने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते