खानापूर
नवीन गटर पण पाणी रस्त्यावरून; चुकीच्या कामामुळे नागरिक हैराण!
खानापूर (प्रतिनिधी):
खानापूर शहरातील विद्यानगर येथील उपनगरामध्ये सध्या काही ठिकाणी गटर बांधण्यात आले आहेत. पण चुकीच्या कामामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आधीच रस्ते खराब त्यात पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.
येथील नागरिकांचे म्हणणे आहे की, गटार यंत्रणा ही चुकीच्या पद्धतीने, निकृष्ट दर्जाने व नियोजनशून्य रितीने बांधली गेल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होत नाही. परिणामी, रस्त्यावर पाणी साचते आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
📣 नागरिकांची मागणी:
तत्काळ गटार यंत्रणेची चौकशी करून खराब झालेला रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहतुकीसाठी योग्य बनवावा, अशी जोरदार मागणी स्थानिकांनी केली आहे.