खानापूर

वाघाचा हल्ला, नागरगाळी पंचायत हद्दीतील घटना, दोन म्हशी दगावल्या

खानापूर: तालुक्यातील नागरगाळी (Nagargali) पंचायत हद्दीत येणाऱ्या उमरापाणी गावात वाघाचा हल्ला झाला असून दोन म्हशी मृत्युमुखी पडल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतात चरण्यासाठी गेलेल्या दोन म्हशींवर वाघाने झडप घेतल्याने या म्हशी जंगलात अर्धवट खाल्लेल्या परीस्थित सापडल्या आहेत.  

खानापूर तालुक्यातील नागरगाळी व लोंढा भागात वन्यजीवांची संख्या लक्षणीयरित्या वाढली असून एकेकाळी दुर्मीळ असलेला वाघहि आता या जंगलांची नवी ओळख बनला आहे. त्यात गवे व चितळांनीहि आघाडी घेतली आहे. तृणभक्षी वाढल्याने मांसभक्षी प्राण्यांतही आपसूकच वाढ झाली आहे. त्यामुळे, अधूनमधून मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत असताना दिसत आहे.

उमरापाणी येथे घडलेल्या या घटनेमुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

tiger attack in nagargali khanapur

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या