खानापूर

मलप्रभा नदीत उडी मारून एकाची  आत्महत्या

खानापूर: तालुक्यातील बिडी गावातील जिवाजी वसंत बिडकर (वय 65) या व्यक्तीने बुधवारी दि.14 रोजी  सायंकाळी खानापूर मलप्रभा नदीच्या पुला वरील जॅकवेल नजीक नदीत उडी टाकुन आत्महत्या केली.

मयत जिवाजी वसंत बिडकर

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार  खिशातील आधार कार्ड नदी काठाजवळील जॅकवेल जवळ ठेऊन नदीत उडी मारली. सदर व्यक्ती वनखात्यात वाचमन म्हणून काम करत होते.  मयत व्यक्तीच्या पत्नीने देखील मागच्या वर्षी आत्महत्या केली होती. याच व्यापातून त्याने आत्महत्या केली असावी असे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.


יו

Back to top button
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली? महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा कसा कोसळला? कारण अनंत गांवकर अबनाळी यांचे यश, 2 लाखाचे बक्षीस खानापूर तालुक्यातील खराब रस्ते