खानापूर

अनमोड घाटात वाहनांच्या चार कि. मी. रांगा

खानापूर : बेळगाव-पणजी महामार्गावरील अनमोड घाटात कर्नाटकच्या हद्दीत रस्त्याच्या मधोमध एक अवजड वाहतूक करणारा ट्रक उलटल्याने शनिवारी रात्री आठ वाजल्यापासून  ईतर वाहनांची दैना उडाली.

महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या सुमारे चार किलोमीटर रांगा लागल्या होत्या. घाटाच्या मध्यभागी मोबाईल रेंज नसल्याने अधिक त्रास झाला.

गोवा-बेळगाव महामार्गावरील रामनगरनजीकच्या अस्तुली पुलावर रस्त्यावर देखील प्रचंड चिखल झाल्याने वाहने अडकून पडत आहेत. 15 दिवसांपासून वाहनांना हा मार्ग बंद झाल्याने कर्नाटकातून गोव्यात जाणारी (अनमोड मार्गे) सर्व वाहने कॅसरलॉक मार्गे 12 किलोमीटरचा फेरा मारून जातात. कॅसरलॉक मार्ग अरुंद असल्याने या मार्गावरही वाहतूक कोंडी होत आहे. 

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या