खानापूर
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; सहा जणांचा मृत्यू, अनेक पर्यटक बेपत्ता
पुणे जिल्ह्यातील देहूजवळील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. घटनास्थळी अजूनही अनेक पर्यटक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, या पूलावर पर्यटकांची गर्दी होती. अचानक पूल कोसळल्याने अनेक जण थेट नदीच्या पात्रात कोसळले. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्ती निवारण पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले असून शोधमोहीम सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी पथके काम करत आहेत. नागरिकांनी या भागात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.