खानापूर
चापगावात अस्वलाचा धुमाकूळ – ग्रामस्थ भयभीत! बंदोबस्ताची मागणी
चापगाव (ता. खानापूर):
गेल्या काही दिवसांत चापगाव परिसरात अस्वलाची हालचाल वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शेतात काम करणारे शेतकरी, रात्रीच्या वेळेस बाहेर पडणारे नागरिक यांना अस्वलाच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवस्वराज्य संघटना आणि गावकरी मंडळींनी मिळून वन विभागाकडे लेखी निवेदन सादर केले.
मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे:
- गावात व शेतशिवारात फिरणाऱ्या अस्वलाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा
- वन विभागाने गस्त वाढवावी, विशेषतः रात्रीच्या वेळेस
- नागरिकांच्या प्राणांची सुरक्षा सुनिश्चित करावी
- भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्थायीक उपाययोजना राबवाव्यात
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अस्वलाने काही जनावरांवर हल्लेही केले असून, शाळकरी मुलांपासून वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
शिवस्वराज्य संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर वन विभागाने ठोस उपाय केले नाहीत, तर ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील.