खानापूर

खानापूरच्या येथे दोन गटांत मारामारी,6 पेक्षा अधिक जण जखमी

खानापूरच्या शाहूनगर विद्यानगर परिसरात जमीन वादातून दोन गटांमध्ये भीषण मारामारी झाली. ही घटना मोबाईलमध्ये कैद झाली असून, या घटनेदरम्यान 6 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

जमीन वादाचे कारण:
सिरॅमिक कारखान्याच्या वर्क्सतर्फे 138 प्लॉट बाबत न्यायालयाचा आदेश होता. त्यानुसार गेल्या पाच दिवसांपासून कारखान्याचे कर्मचारी जमीन स्वच्छ करत होते. याच दरम्यान,  काही लोकांनी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.

6 पेक्षा अधिक लोक जखमी:
मिळालेल्या माहितीनुसार खानापूरच्या विद्यानगरमधील संदीप पाटील आणि परशुराम अंकुश पाटील या दोघांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तातडीने बेळगावच्या बीएम्स रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत.

या हल्ल्यात एकूण 6 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले असून जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

50 पेक्षा अधिक लोकांचा हल्ला:
या नागरिकांवर अचानक 50 पेक्षा अधिक लोकांनी हल्ला चढवला. या हल्ल्यासाठी क्रिकेट बॅट, लाठ्या, दगड आणि विटांचा वापर करण्यात आला. ही घटना खानापूर पोलिस स्टेशन हद्दीत घडली

Back to top button
digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? फसवणूक कशी होते? काय करावे digital arres अल्लू अर्जुन याला का अटक झाली?