खानापूर

मऱ्याम्मा देवीच्या वारांना 27 मेपासून सुरुवात; 10 जूनला ओट्या भरण्याचा कार्यक्रम

प्रतिनिधी | खानापूर
खानापूर शहरातील श्रद्धास्थान असलेल्या मऱ्याम्मा देवीच्या वारांना मंगळवार, 27 मे पासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर 30 मे, 3 जून, 6 जून आणि 10 जून रोजी देखील देवीचे वार पाळले जाणार आहेत.

या धार्मिक परंपरेनुसार, 10 जून रोजी मऱ्याम्मा देवीच्या ओट्या भरल्या जातील. तर 11 जून, बुधवार रोजी नवस फेडण्याचा विधी पार पडणार आहे.

दरम्यान, खानापूरच्या ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवीच्या वारांना 22 एप्रिलपासून सुरुवात झाली होती. आतापर्यंत चार वार पार पडले असून, 20 मे आज पाचवा आणि शेवटचा वार महालक्ष्मी मंदिरात नैवेद्य व ओट्या भरण्याच्या कार्यक्रमाने साजरा होत आहे.

सर्व भाविकांनी या धार्मिक कार्यात सहभागी व्हावे आणि देवीचा कृपाशीर्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या