खानापूर
गृहलक्ष्मी-अन्नभाग्य योजना बंद? मुख्यमंत्री म्हणाले..

बेंगळूरू: गेल्या तीन महिन्यांपासून गृहलक्ष्मी (Gruha Lakshmi) आणि अन्नभाग्य योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत, त्यामुळे कर्नाटक सरकारने सुरु केलेली गृहलक्ष्मी योजना व अन्नभाग्य योजना बंद होणार अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.
या संदर्भात आज पत्रकारांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना विचारले असता प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, “कोणतीही योजना थांबवली जाणार नाही. पेमेंट देण्यात उशिरा झाला असला तरी, ते लवकरच पूर्ण केले जाईल.”,” असे त्यांनी स्पष्ट केले.
बजेट बाबत महत्त्वाची माहिती देताना ते म्हणाले की, येत्या 7 मार्चला बजेट सादर केले जाईल, तर 3 मार्चपासून अधिवेशनाला सुरुवात होईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केले. Gruha Lakshmi payment
karnataka,Karnataka Chief Minister Siddaramaiah ,budget

