खानापूर

अंकले येथे बैलांची चोरी, चोरट्यांनी कुलूप तोडून बैले पळवली

खानापूर: शहरापासून जवळचं असलेल्या माळअंकले गावात काल मध्यरात्री शेतातील घरातून दरवाजा कुलुप तोडून बैलजोडी चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

माळअंकले गावातील संतोष राजाराम चोपडे यांनी  गावापासुन दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या शेतातील घरात नेहमीप्रमाणे बैलजोडी व गुरे बांधली होती. काल 17 ऑगस्ट रोजी 8.30 वाजता गुरांचे दूध काढून गुरांना व बैलांना गवत घालून दरवाजा बंद करून घरी परतले.

परत सकाळी गुरांना गवत घालण्यासाठी शेतात गेले असता त्यांना शेतातील घराचा कुलूप तोडून बैलांची चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी त्वरित गावातील नागरिकांसोबत शोधाशोध सुरू केली . बैले सापडली नसल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिस शोध घेत आहेत.

पोलिसांनी गनेबैल टोल तसेच जवळील सीसीटिव्ही फुटेज चेक करून शोध सुरू केला आहे.

एक ते दिड लाखांच्या बैलांची चोरी झाल्याने या भागातील शेतकरी भयभीत झाले आहेत.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या