खानापूर

देवलत्ती आणि कामसीनकोप्प गावांतील शेतजमिनींना पूर्वीप्रमाणेच वीजपुरवठा द्यावा : तहसीलदारांना निवेदन

खानापूर: तालुक्यातील देवलत्ती आणि कामसीनकोप्प या गावांमधील शेतकरी आणि ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर एकत्र येत आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन दिले.   हेस्कॉम विभागाने या गावांतील शेतजमिनींना पूर्वी ज्या पद्धतीने वीजपुरवठा केला जात होता, तसाच वीजपुरवठा पुन्हा सुरु करावा, अशी मागणी त्यांनी केली.

त्यानंतर त्यांनी तहसीलदार आणि हेस्कॉमच्या अभियंत्यांना निवेदन सादर करून येत्या तीन दिवसांत शासनाच्या वेळापत्रकानुसार नियमित वीजपुरवठा सुरु करावा, अन्यथा देवलत्ती, कामसीनकोप्प आणि आजूबाजूच्या गावांतील शेतकरी तहसील कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह करण्यास बाध्य होतील, असा इशाराही दिला.

शेतकऱ्यांचे हाल टाळावेत आणि त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. तहसीलदार दुंडप्प कोमार यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या