खानापूर

स्थलांतराबाबत आज सर्व पक्षीय बैठक

खानापूर:  खानापूर तालुक्यातील अती दुर्गम भागात भीमगड अभयारण्यात राहणाऱ्या खानापूर तालुक्यातील 13 गावांच्या ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यासंदर्भात आज 16 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक खानापूर येथे आमदारांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

अभयारण्यात राहणाऱ्या नागरिकांना रस्ते, पाणी, वीज आणि इतर मुलभूत सुविधा पुरविता येत नाहीत. त्यामूळे राज्यसरकारने त्यांचे स्थलांतर करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या 13 गावातील नागरिकांनी स्वेच्छेने स्थलांतर करण्यास सहमती दर्शविल्यास त्यांचे स्थलांतर जागा आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी योग्य निर्णय सर्वानुमते घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या