दोन अस्वलांच्या हल्ल्यात शेतकरी तुकाराम देसाई गंभीर जखमी!
रामनगर (प्रतिनिधी): जोयडा तालुक्यातील उडसा गावात आज दुपारी एक भीषण घटना घडली. शेतात काम करत असलेल्या तुकाराम देसाई (वय अंदाजे ५०) या शेतकऱ्यावर अचानक दोन अस्वलांनी हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या धारवाड येथील एस.डी.एम.सी. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, आज दुपारी उडसा गावच्या सीमेलगत असलेल्या शेतात तुकाराम देसाई हे एकटेच शेतीची कामे करत असताना ही घटना घडली. अचानक दोन अस्वलांनी त्यांच्यावर झडप घालून जबर जखमी केले. त्यांच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली आणि अस्वलांना पळवून लावले.
घटनेनंतर संजीवनी सेवा ट्रस्टच्या रुग्णवाहिकेने तुकाराम देसाई यांना तात्काळ जोयडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धारवाड येथे हलवण्यात आले.या घटनेनंतर उडसा गावासह आजूबाजूच्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर उडसा गावासह आजूबाजूच्या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.