खानापूर

खानापूर तालुक्यातील माचाळी गाव पाणीटंचाईने त्रस्त, ग्रामस्थांची पंचायतीकडे मागणी

खानापूर: तालुक्यातील मोहिशेत पंचायत क्षेत्रातील माचाळी गाव पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जात आहे. अनेक वेळा मागणी करूनही ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे येत्या उन्हाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गावात नवीन पाणी योजनेचे काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे पाणीटंचाईची समस्या कायम आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी पंचायत अध्यक्ष आणि पंचायत पीडीओ यांना निवेदन देऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पंचायत प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! ashadhi ekadashi quotes in marathi: Ashadhi ekadashi 2025: आषाढी एकादशीचे महत्त्व digital fast: डिजिटल उपवास: फायदे आणि तोटे कामाचा ‘6-6-6’ नियम: कमी वेळेत जास्त यश! सोन्याच्या दरात आणखी घसरण! आजचे ताजे भाव जाणून घ्या